सांगली,
दि. 12 (जि. मा. का.) : अतिवृष्टीमुळे तसेच कोयना व वारणा धरणातून सोडलेल्या
विसर्गामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली
आहे. याशिवाय जिल्ह्यातील पलूस, मिरज, वाळवा, शिराळा या तालुक्यातील रस्ते व पूल
पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना
घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्तकालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा
परिणाम शालेय विद्यार्थी यांच्यावर होऊ नये याकरिता सांगली जिल्ह्यातील पलूस, मिरज
आणि वाळवा तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व
महाविद्यालये यांना मंगळवार दि. 13 ऑगस्ट 2019 रोजी सुट्टी घोषित करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी ही माहिती दिली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा