सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

मिरज शासकीय कोविड रूग्णालयामध्ये अतिरिक्त 6 के एल क्षमतेचा ऑक्सिजन टँक - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

क्षमता वृध्दीचा रूग्णांना होणार लाभ सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : वाढत्या कोविड-19 रूग्णांच्या संख्येमुळे मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये जिल्हा प्रशासनाने व्हेंटिलेटर व विशेषतः एच. एफ. एन. ओ. या विशेष उपचार पद्धतीची सुविधा उपलब्ध करून दिली. मिरज येथील रुग्णालयामध्ये 54 व्हेंटीलेटर व 16 एच. एफ. एन. ओ. उपकरणे गंभीर व अतिगंभीर रुग्णांच्या उपचाराकरिता उपलब्ध आहेत. तथापि, या उपकरणांना लागत असणाऱ्या ऑक्सिजनचा वाढीव पुरवठा करण्याकरिता ऑक्सिजनचा अतिरिक्त क्षमतेचा टँक उपलब्ध करणे अत्यंत गरजेचे होते. आत्तापर्यंत 6 के एल या क्षमतेचा ऑक्सीजन टॅंक होता. वाढती रुग्ण संख्या पाहता ऑक्सिजनची गरज प्रचंड प्रमाणात वाढल्याने जिल्हा प्रशासनाने त्याची क्षमता दुप्पट म्हणजेच 12 के एल करण्याचा निर्णय तात्काळ घेतला व अंमलबजावणी सुद्धा केली. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सद्यस्थितीत मिरज येथील शासकीय कोविड रुग्णालयांमध्ये 315 ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. यामुळे गंभीर व अतिगंभीर रुग्णांची तात्काळ व अधिक चांगल्या पद्धतीने सुरक्षित उपचार होत आहेत. मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये गरीब तसेच गंभीर व अतिगंभीर रुग्णांचे उपचार अधिक प्रमाणात होत असल्याने शासनामार्फत आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा तात्काळ होणे अत्यंत गरजेचे होते. ऑक्सिजन टँकची क्षमता वाढविल्यामुळे सर्व रुग्णांना ही एक दिलासा मिळणारी बाब आहे. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी अधिक लक्ष घालून तत्पर कार्यवाही केल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. कोविड-19 ची वैश्विक साथ सुरू झाल्यानंतर मिरज कोविड रुग्णालयामध्ये आजतागायत 1796 रुग्णांना उपचार करण्यात आलेले आहेत. त्यामधील 1333 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. रुग्णांची बरे होण्याची टक्केवारी 73.55 आहे. सदर रुग्णालयातील रिकव्हरी रेट हा राष्ट्रीय निर्देशांकापेक्षा चांगला आहे. तसेच जिल्ह्याचा मृत्युदर 3.5 टक्के असून तो राष्ट्रीय निर्देशांकच्या बरोबर आहे. आजतागायत मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वायरल रीसर्च डिसीज लॅबोरेटरी ( VRDL )मध्ये 49066 इतक्या स्वॅबच्या तपासण्या करण्यात आलेल्या आहेत. त्यातील 70.78 टक्के इतके रुग्णांना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले आहेत व पॉझिटिव्हिटी रिपोर्टची टक्केवारी 14.24 टक्के आहे. 000000 <

रविवार, २३ ऑगस्ट, २०२०

गणशोत्सव व मोहरमचे कार्यक्रम कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव होणार नाही अशा पध्दतीने साजरे करण्यासाठी काटेकोर नियोजन - गृह (गामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई

सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : लोकांच्या सुरक्षिततेसाठी व गर्दी झाल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये ही भूमीका लक्षात घेऊन घरगुती व साध्या पध्दतीने उत्सव साजरे करत आहोत. याबाबत अधिक सतर्क रहाण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सर्व गणशोत्सव व मोहरमचे कार्यक्रम सुरळीतपणे, साध्या पध्दतीने व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून व कोणत्याही पध्दतीने कोरोना विषाणूच्या संसर्गाचा फैलाव होण्यास वाव मिळेल अशा पध्दतीने होणार नाहीत, ते काळजीपूर्वक केले जातील, असे काटेकोर नियोजन केले आहे, असे प्रतिपादन गृह (गामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. गणेशोत्सव व मोहरमच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था याबाबत आढावा बैठक शासकीय विश्रामगृह तासगाव येथे झाली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार सुमनताई पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे यांच्यासह पोलीस विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. गृह (गामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, गतवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केलेल्या मंडळापैकी यावषीर् 60 ते 65 टक्के गणेशोत्सव मंडळळानी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी एक गाव एक गणपतीची संकल्पना सुध्दा राबविली आहे. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा व सर्व पोलीस अधिकारी यांनी गणेशोत्सवाच्या अगोदरच लोकांच्यामध्ये जनजागृती केल्यामुळे तसेच नागरिकांनी छोट्या स्वरूपात व घरगुती गणेशोत्सव साजरा करावा ही भावना सामान्य माणसांपर्यंत पोहोचवल्यामुळे गणेश मंडळांचा, गणेश भक्तांचा, गावांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. काल गणेशोत्सव सुरू झाला पण कोठेही मोठ्या प्रमाणावर मिरवणुका झाल्या नाहीत. जी कार्यपध्दती गणेशोत्सवासाठी ठेवली आहे तीच कार्यपध्दती मोहरमसाठी सुध्दा ठेवली आहे. यासाठी मुस्मीम बांधवांचेही चांगले सहकार्य मिळाले असून त्यांनी सुध्दा गणेशोत्सवाप्रमाणे मोहरम सुध्दा घरगुतीच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मिरवणूका व उत्सवाचा फारसा ताण पोलीस दलावर येणार नाही. तरीसुध्दा पोलीस दल सतर्क आहे. सर्व अधिकाऱ्यांना सतर्क रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. गणेशोत्सव घरगुती पध्दतीने व साध्या पध्दतीने साजरा व्हावा यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबईतल्या मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची एक महिन्यापूर्वीच ऑनलाईन बैठक घेतली होती. यामध्ये गणेशोत्सव मंडळानी शासन जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असे सांगितले होते. त्याप्रमाणे पूर्ण राज्यात कोठेही मोठे उत्सव, मंडप, डेकोरेशन नसून घरगुती पध्दतीने गणेशोत्सव साजरा होत असल्याचे ते म्हणाले. तत्पूर्वी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी गणेशोत्सव व मोहरमच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहाण्याच्या अनुषंगाने केलेले नियोजन, बंदोबस्त, विसर्जन मिरवणूका याबाबत सविस्तर आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सविस्तर माहिती दिली. 00000

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०

कोविड रूग्णांवर औषधोपचार करण्यास टाळाटाळ केल्याने 5 कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत एफआयआर दाखल

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : घाटगे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, पी. जी. इन्स्टीट्युट अँन्ड रिसर्च सेंटर, सांगली हे कोविड-19 रूग्णांवर उपचारासाठी महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आदेशित केल्यानुसार कार्यान्वित केले आहे. या हॉस्पीटलमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या 5 कर्मचाऱ्यांनी कोविड रूग्णांवरती औषधोपचार करण्यास टाळाटाळ केल्याने त्यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाणे येथे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल अंबोळे यांनी एफआयआर दाखल केली आहे. सद्या सुरू असलेल्या कोविड-19 या संसर्गजन्य विषाणूच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय साथ रोग अधिनियम 1987 नुसार आणि महाराष्ट्र इसेन्सियल सर्व्हिसेस मेन्टनंस ॲक्ट 2005 हा अधिनियम देशामध्ये लागू करण्यात आलेला आहे. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीमध्ये कोविड-19 हॉस्पीटल सुरू करण्यात आली आहेत तेथे रूग्णावर उपचार सुरू असून शासकीय रूग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त कोविड-19 रूग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. सांगली मिरज कुपवाड शहर महानरपालिकेचे आयुक्त यांच्याकडील आदेशानुसार घाटगे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, पी. जी. इन्स्टीट्युट अँन्ड रिसर्च सेंटर, सांगली हे अधिग्रहित करण्यात येवून त्यांना कोविड-19 च्या रूग्णांवर उपचार करण्याबाबत निर्देशित केले आहे. मनिषा आवळे, सुनिता माने (चेलेकर), कलावती बाबर, प्रज्ञा थोरवत, सोनाली करंडे यांच्याविरूध्द मेस्मा अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 00000

कोविड-19 उपचारासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या रूग्णालयांचे फायर व इलेक्ट्रीक ऑडीट होणार

सांगली, दि. 21 , (जि. मा. का.) : कोविड-19 च्या उपचारासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या रूग्णालयांचे फायर व इलेक्ट्रीक ऑडीट त्वरीत करून घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महनगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी राजेंद्र गाडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा कोषागार अधिकारी सुशिलकुमार केंबळे, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल आंबोळे आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोविड-19 च्या उपचारासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या रूग्णालयांचे फायर व इलेक्ट्रीक ऑडीट करून घ्यावे. तपासणीअंती नोंदविण्यात आलेली निरीक्षणे व त्या अनुषंगाने आवश्यक दुरुस्त्या करावयाच्या असल्यास त्याबाबत लेखी संबंधित रुग्णालयांना कळविण्यात यावे व संबंधितांकडून त्याबाबतची पूर्तता करून घेण्यात यावी. कोविड रूग्णालयांच्या तपासणीसाठी नेमन्यात आलेल्या टीमने कमीत कमी प्रत्येक दिवशी एका रूग्णालयाची तपासणी करावी. भरारी पथकाच्या कारवाई अंतर्गत प्राप्त झालेल्या अहवालावर जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी व जिल्हा कोषागार अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करावी. रॅपिड ॲन्टीजन टेस्ट किटची मागणी करण्याबाबत यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देश दिले. तसेच कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी आणखी खाजगी हॉस्पीटल अधिग्रहित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 32.06 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 21 , (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 32.06 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 94.73 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 12.88 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 9.09 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी., उरमोडी धरणात 9.49 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टी.एम.सी, तारळी धरणात 5.46 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 5.85 टी.एम.सी. आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 24.12 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.36 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 100.51 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे. सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग क्युसेक्स मध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 12059, धोम 199, कण्हेर 2714, वारणा 11978, दूधगंगा 1800, राधानगरी 4256, तुळशी 507, कासारी 250, पाटगाव 2818, धोम बलकवडी 1210, उरमोडी 1710, तारळी 1442, अलमट्टी 2 लाख 50 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 18.6 (45), आयर्विन पूल सांगली 24.8 (40) व अंकली पूल हरिपूर 32.6 (45.11). 00000

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२०

जत तालुक्यात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आलेल्या ठिकाणी कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात

सांगली, दि. 18, (जि. मा. का.) : जत तालुक्यातील जत शहरातील खाटीक गल्ली, नाटेकर गल्ली, नीलसागर लॉज परीसर, रामराव नगर व दुधाळ वस्ती, डोर्ली (मातंग समाज वस्ती), बालगाव (उमराणी वस्ती) येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जत उपविभागीय दंडाधिकारी प्रशांंत आवटे यांनी दिली. सदर भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जत उपविभागीय दंडाधिकारी प्रशांत आवटे यांनी दिले आहेत. 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 31.58 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 18 , (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 31.58 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 91.95 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 11.96 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 9.17 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी., उरमोडी धरणात 9.30 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टी.एम.सी, तारळी धरणात 5.33 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 5.85 टी.एम.सी. आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 23.54 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.29 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 100.64 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे. सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे कोयना धरणातून 55486 क्युसेक्स, धोम 210, कण्हेर धरणातून 6956 क्युसेक्स, वारणा धरणातून 12042 क्युसेक्स, दूधगंगा धरणातून 7700 क्युसेक्स, राधानगरी धरणातून 4256 क्युसेक्स, तुळशी धरणातून 504 क्युसेक्स, कासारी धरणातून 1300 क्युसेक्स, पाटगाव 2393 क्युसेक्स, धोम बलकवडी धरणातून 1233 क्युसेक्स, उरमोडी धरणातून 1710 क्युसेक्स, तारळी धरणातून 2626 क्युसेक्स, अलमट्टी धरणातून 2 लाख 50 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 27.6 (45), आयर्विन पूल सांगली 39 (40) व अंकली पूल हरिपूर 42.6 (45.11). 00000

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी जिल्हा क्रीडा संकुल सांगलीच्या बाजूला कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी 400 खाटांचे हॉस्पीटल उभा करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाला देण्यात आला असून यावर लवकरच निर्णय होऊन त्याचे काम लवकरच सुरू होईल. कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे गरज नसताना घराच्या बाहेर पडू नये. कोरोनापासून दूर राहण्यासाठी अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली व राष्ट्रगीत झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली अशोक वीरकर यांनी संचलनाचे नेतृत्त्व केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, महापौर गीता सुतार, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, मिरज पोलीस उपविभागीय अधिकारी संदीपसिंह गिल, पद्मश्री विजयकुमार शहा यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, अन्य पदाधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना आजाराचा फैलाव वेगाने होत आहे. कोरोना नियंत्रणासाठी शासकीय यंत्रणा गेल्या काही महिन्यापासून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. काही विलंब व अडचणी समजून घेऊन त्यांना सर्वांनी साथ देणे गरजेचे आहे. हे संकट नेहमीचे व साधारण संकट नाही. या संकटाच्या काळात सर्वांनी समजून घेऊन प्रशासकीय काम करणाऱ्या कोरोना योध्यांना साथ देणे गरजेचे आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनिधी यांनीही या संकटाच्या काळात अतिशय चांगले काम केले आहे. कोरोनाबाबत लोकांची जागृती व समजूत घालणे हाच उपाय आहे. आरोग्य विभागाने 50 वर्षावरील व कोमॉर्बिडिटी असलेल्या नागरिकांची तपासणी मोहीम हाती घेतली असून त्यांची वारंवार तपासणी व त्यांना काही अडचणी आहेत का हे पाहण्याचे काम आरोग्य यंत्रणा करीत आहे असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोनाच्या काळात कोमॉर्बिडिटी असणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या कोरोनापासून बचाव हाच सर्वोत्तम उपाय आहे. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्याने आत्तापर्यंत अनेक प्रकारच्या आपत्ती पाहिल्या आहेत. पूर, दुष्काळ, गतवर्षीचा भीषण महापूर, अवकाळी पाऊस आणि आता यावर्षी कोरोना. हे सारे आघात पेलताना जिल्हा प्रत्येकवेळी धैर्याने उभा राहिला. प्रत्येक संकटाने आपल्याला अधिक कणखर आणि संघर्षशील बनविले. कोरोनाशी लढताना कोणतीही सरावलेली युध्दसामग्री कुचकामी ठरते. अशा परिस्थितीतही जिल्हा खंबीरपणे कोरोना योध्यांच्या, प्रशासनाच्या बाजूने सहनशिलतेने उभा आहे. प्रशासनातील सर्व यंत्रणा झोकून देवून अहोरात्र राबत आहे. सर्व लोकप्रतिनिधीही एकदिलाने साथ देत आहेत. सांगली जिल्हावासियांनी तर संकटाच्या या काळात संयम बाळगून प्रशासनाला दिलेली साथ अतुलनीय आहे. यासाठी मी सर्वांचाच ऋणी आहे. जसजशी कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे तसतसे शासकीय रूग्णांलयाबरोबरच खाजगी रूग्णालयेही अधिग्रहित करण्यात येत आहेत. उपचारापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर कार्यान्वीत करण्यात आले आहेत. तसेच काही ग्रामीण रूग्णालयांमधून व उपजिल्हा रूग्णालयांमध्ये डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले आहेत, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा हे सर्व घटक कोणतीही तमा न बाळगता या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र झटत आहे. यांच्या जोडीला खाजगी रूग्णालयातील डॉक्टर्स व त्यांचे सर्व सहकारी यांनीही रूग्ण सेवेचे आपले आद्य कर्तव्य पार पाडण्यासाठी पुढाकार घेणे ही वेळेची गरज आहे. खाजगी क्षेत्रातील सर्व आरोग्य यंत्रणेतील घटक यासाठी संपूर्ण योगदान देतील. आणि मानव जातीच्या इतिहासात उदभवलेल्या या अभूतपूर्व महामारीच्या संकटात आपल्या संपूर्ण क्षमता वापरून योगदान देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्ह्यात आजमितीस 5 हजार 700 हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. जवळपास तीन हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधून गत आर्थिक वर्षात 7 कोटी 32 लाखाची तर यावर्षी 10 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच शासनाकडून 4 कोटी 65 लाखाचा निधीही आत्तापर्यंत उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोरोना आज प्रत्येकाच्या दारात आला आहे, मात्र त्याला उंबरठ्यावरुनच परत पाठवायचं असेल तर नागरिकांनी घरी राहूनच कोरोनाशी दोन हात केले पाहिजेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात गेल्या वर्षी उदभवलेल्या महापूराच्या पार्श्वभूमीवर यंदा पूरप्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना नियोजनबध्दरितीने केल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, पडणारा पाऊस, धरणातील पाणीसाठा, धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन, नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा आणि पूरग्रस्तांसाठी बचाव व मदत कार्य याचे शास्त्रशुध्द नियोजन केले आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय ठेऊन अलमट्टी धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग यावर अधिक लक्ष देण्यात येत आहे. जिल्ह्यात गतवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांसाठी एक हेक्टर पर्यंतच्या पीक कर्जास माफी जाहीर करण्यात आली होती. यासाठी सातत्याने पाठपुरावा करून 131 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून घेतला. जिल्ह्यातील 26 हजार 256 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 130 कोटी 91 लाख रक्कम वर्ग करून पुरबाधीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत 74 हजार 771 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 443 कोटी 68 लाख रक्कम वर्ग करण्यात आली. यावर्षी खरीपासाठी 1497 कोटी पीक कर्जाचे उद्दिष्ट आहे. 31 जुलै अखेर 1025 कोटी रूपयांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. उर्वरित उद्दिष्टही लवकरच साध्य होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 मार्च 2020 पासून शासनाने केवळ पाच रुपयात शिवभोजन थाळी योजना राबवून अडचणीत सापडलेल्या गरीब आणि गरजू जनतेला पोटभर जेवण उपलबध करुन दिले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 21 शिवभोजन केंद्रामार्फत ४ लाखाहून अधिक थाळ्याचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाबरोबरच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगानेही पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. लॉकडाऊन अंमलबजावणी, कंटेनमेंट झोन व्यवस्थापन, दैनंदिन आवश्यक वस्तुंची घरपोच सेवा या सर्वांमध्ये उत्कृष्ट काम केले आहे. जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प टेंभू, ताकारी व म्हैसाळ या उपसा सिंचन येाजनांमुळे 9 तालुक्यातील सुमारे 1 लाख 80 हजार हेक्टराहून अधिक क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार असून सद्यस्थितीत या सर्व क्षेत्रास सिंचनाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या लाभ दिला जातो. या उपसा सिंचन योजनांमधून सद्यस्थितीत वार्षिक 30 ते 35 टीएमसी पाणी अनेक टप्प्यांव्दारे उचलून आवर्षण भागातील शेतीसाठी सिंचन सुविधा पुरविण्यात येते. तसेच प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील लहान मोठे तलाव भरून दिले जात आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना व पशुधनास टंचाई कालावधीत टंचाई निवारणार्थ फार मोठी मदत झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कृषि विभागाच्या आत्मा अंतर्गत नाविण्यपूर्ण योजनेतून 200 शेत तलावामध्ये मत्स्यपालनाचा उपक्रम राबविण्यात आला. शेततळी अस्तरीकरणासाठी सुमारे 2 हजार शेतकऱ्यांना 12 कोटी अनुदान दिले. त्यामुळे शेततळ्यामध्ये 12 लाख 58 हजार 350 घनमीटर पाणीसाठ्यामध्ये वाढ होऊन त्याचा लाभ पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या क्षेत्रातील द्राक्ष पिकाला झाला असल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, 26 कोटी 25 लाख रूपये अनुदान वितरीत करून 13 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना 6784 हेक्टरवर ठिबक सिंचनाचा लाभ दिला. लॉकडाऊन काळात 3 हजार 906 क्विंटल बियाणे व 8 हजार 966 मेट्रिक टन रासायनिक खते 20 हजार 200 शेतकऱ्यांच्या बांधावर पुरवठा केली आहेत. प्रत्येक पातळीवर सर्वसामान्य माणसाचे जीवन सुरळीत चालावे यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगलीकरांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते कोरोना योध्दा पुरस्कार डॉ. प्रिया बिडवे, डॉ. अंजना पलकंडी, कक्षसेवक अनिल कांबळे, आशा वर्कर मनिषा कांबळे, साधना खाडे, अरूणा शिंदे, सहिदा जमादार व वर्षा ढोबळे, कोरोना विषयक विशेष कामगिरीबध्दल जमीर पाथरवट, अनिल मादरगे, कोरोना मुक्त झालेल्या हौसाबाई पाटील, ताराबाई खोत, बाबासाहेब खोत, प्रकाश पांढरे, कोरोना जनजागृतीसाठी पत्रकार दीपक चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2018-19 युवराज खटके, सुरेश चौधरी, सुरेश सावंत, प्रियंका कारंडे, गिरीष जकाते, विशाल पवार यांना देण्यात आला. सन 2016-17 चा जिल्हा युवा पुरस्कार प्रताप मेटकरी, योगीता मगदूम व एकलव्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सांगली यांना, 2017-18 चा जिल्हा युवा पुरस्कार चंद्रशेखर तांदळे, माया गडदे व इन्साफ नॅचरल सिक्युरिटी ऑफ ॲनिमल फाऊंडेशनचे अध्यक्ष मुस्ता मुजावर यांना व सन 2018-19 चा जिल्हा युवा पुरस्कार मयुर लोंढे, अनिता पाटील यांना पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते देण्यात आला. पूरस्कार वितरणानंतर पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्वातंत्र्य सैनिक, कोरोना योध्दे, नागरिक यांना भेटून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : शासकीय रूग्णालयांमध्ये कर्मचारी वर्ग अपूरा पडत आहे याचा सविस्तर आढावा घेऊन यावर मार्ग काढण्यासाठी कंत्राटी तत्वावर मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता यांनी तात्काळ प्रस्ताव तयार करावा व तो मंत्रालय स्तरावर सादर करावा. त्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, असे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने पालकमंत्री जयंत पाटील यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यात सद्यस्थितीत 5 हजार 788 एकूण कोरोना बाधीत असून यातील 2 हजार 517 कोरोना बाधीत उपचाराखाली आहेत. तर 3 हजार 70 रूग्ण बरे झाले आहेत. महानगरपालिका क्षेत्रात तुलनेने प्रादुर्भाव जास्त आहे. या सर्व बाबींचा आढावा घेऊन सद्यस्थितीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी सविस्तर चर्चा केली. सांगलीत उभारण्यात येत असणारे ऑक्सीजन प्लँट व मिरज येथील ऑक्सीजन प्लँटची क्षमता वृध्दी याबाबतही चर्चा करून पालकमंत्री जयंत पाटील यांनी अधिग्रहित रूग्णालयांमधून रूग्णांकडून जादा दराने बिलांची आकारणी होऊ नये यासाठी प्रत्येक खाजगी रूग्णालयांवर शासकीय ऑडीटर नेमून खात्री करावी. रूग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा चांगला असावा. रूग्ण मृत झाल्यास स्वॅबचा अहवाल येण्यामध्ये होत असलेला विलंब कमी करावा याबाबत निर्देशित केले. 00000

सांगलीत कोरोना रूग्णांवर उपचारासाठी 400 खाटांचे हॉस्पीटल लवकरच उभारणार - पालकमंत्री जयंत पाटील

भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी जिल्हा क्रीडा संकुल सांगलीच्या बाजूला कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी 400 खाटांचे हॉस्पीटल उभा करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाला देण्यात आला असून यावर लवकरच निर्णय होऊन त्याचे काम लवकरच सुरू होईल. कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे गरज नसताना घराच्या बाहेर पडू नये. कोरोनापासून दूर राहण्यासाठी अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली व राष्ट्रगीत झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली अशोक वीरकर यांनी संचलनाचे नेतृत्त्व केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, महापौर गीता सुतार, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, मिरज पोलीस उपविभागीय अधिकारी संदीपसिंह गिल, पद्मश्री विजयकुमार शहा यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, अन्य पदाधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना आजाराचा फैलाव वेगाने होत आहे. कोरोना नियंत्रणासाठी शासकीय यंत्रणा गेल्या काही महिन्यापासून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. काही विलंब व अडचणी समजून घेऊन त्यांना सर्वांनी साथ देणे गरजेचे आहे. हे संकट नेहमीचे व साधारण संकट नाही. या संकटाच्या काळात सर्वांनी समजून घेऊन प्रशासकीय काम करणाऱ्या कोरोना योध्यांना साथ देणे गरजेचे आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनिधी यांनीही या संकटाच्या काळात अतिशय चांगले काम केले आहे. कोरोनाबाबत लोकांची जागृती व समजूत घालणे हाच उपाय आहे. आरोग्य विभागाने 50 वर्षावरील व कोमॉर्बिडिटी असलेल्या नागरिकांची तपासणी मोहीम हाती घेतली असून त्यांची वारंवार तपासणी व त्यांना काही अडचणी आहेत का हे पाहण्याचे काम आरोग्य यंत्रणा करीत आहे असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोनाच्या काळात कोमॉर्बिडिटी असणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या कोरोनापासून बचाव हाच सर्वोत्तम उपाय आहे. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्याने आत्तापर्यंत अनेक प्रकारच्या आपत्ती पाहिल्या आहेत. पूर, दुष्काळ, गतवर्षीचा भीषण महापूर, अवकाळी पाऊस आणि आता यावर्षी कोरोना. हे सारे आघात पेलताना जिल्हा प्रत्येकवेळी धैर्याने उभा राहिला. प्रत्येक संकटाने आपल्याला अधिक कणखर आणि संघर्षशील बनविले. कोरोनाशी लढताना कोणतीही सरावलेली युध्दसामग्री कुचकामी ठरते. अशा परिस्थितीतही जिल्हा खंबीरपणे कोरोना योध्यांच्या, प्रशासनाच्या बाजूने सहनशिलतेने उभा आहे. प्रशासनातील सर्व यंत्रणा झोकून देवून अहोरात्र राबत आहे. सर्व लोकप्रतिनिधीही एकदिलाने साथ देत आहेत. सांगली जिल्हावासियांनी तर संकटाच्या या काळात संयम बाळगून प्रशासनाला दिलेली साथ अतुलनीय आहे. यासाठी मी सर्वांचाच ऋणी आहे. जसजशी कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे तसतसे शासकीय रूग्णांलयाबरोबरच खाजगी रूग्णालयेही अधिग्रहित करण्यात येत आहेत. उपचारापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर कार्यान्वीत करण्यात आले आहेत. तसेच काही ग्रामीण रूग्णालयांमधून व उपजिल्हा रूग्णालयांमध्ये डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले आहेत, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा हे सर्व घटक कोणतीही तमा न बाळगता या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र झटत आहे. यांच्या जोडीला खाजगी रूग्णालयातील डॉक्टर्स व त्यांचे सर्व सहकारी यांनीही रूग्ण सेवेचे आपले आद्य कर्तव्य पार पाडण्यासाठी पुढाकार घेणे ही वेळेची गरज आहे. खाजगी क्षेत्रातील सर्व आरोग्य यंत्रणेतील घटक यासाठी संपूर्ण योगदान देतील. आणि मानव जातीच्या इतिहासात उदभवलेल्या या अभूतपूर्व महामारीच्या संकटात आपल्या संपूर्ण क्षमता वापरून योगदान देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्ह्यात आजमितीस 5 हजार 700 हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. जवळपास तीन हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधून गत आर्थिक वर्षात 7 कोटी 32 लाखाची तर यावर्षी 10 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच शासनाकडून 4 कोटी 65 लाखाचा निधीही आत्तापर्यंत उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोरोना आज प्रत्येकाच्या दारात आला आहे, मात्र त्याला उंबरठ्यावरुनच परत पाठवायचं असेल तर नागरिकांनी घरी राहूनच कोरोनाशी दोन हात केले पाहिजेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात गेल्या वर्षी उदभवलेल्या महापूराच्या पार्श्वभूमीवर यंदा पूरप्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना नियोजनबध्दरितीने केल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, पडणारा पाऊस, धरणातील पाणीसाठा, धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन, नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा आणि पूरग्रस्तांसाठी बचाव व मदत कार्य याचे शास्त्रशुध्द नियोजन केले आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय ठेऊन अलमट्टी धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग यावर अधिक लक्ष देण्यात येत आहे. जिल्ह्यात गतवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांसाठी एक हेक्टर पर्यंतच्या पीक कर्जास माफी जाहीर करण्यात आली होती. यासाठी सातत्याने पाठपुरावा करून 131 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून घेतला. जिल्ह्यातील 26 हजार 256 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 130 कोटी 91 लाख रक्कम वर्ग करून पुरबाधीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत 74 हजार 771 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 443 कोटी 68 लाख रक्कम वर्ग करण्यात आली. यावर्षी खरीपासाठी 1497 कोटी पीक कर्जाचे उद्दिष्ट आहे. 31 जुलै अखेर 1025 कोटी रूपयांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. उर्वरित उद्दिष्टही लवकरच साध्य होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 मार्च 2020 पासून शासनाने केवळ पाच रुपयात शिवभोजन थाळी योजना राबवून अडचणीत सापडलेल्या गरीब आणि गरजू जनतेला पोटभर जेवण उपलबध करुन दिले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 21 शिवभोजन केंद्रामार्फत ४ लाखाहून अधिक थाळ्याचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाबरोबरच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगानेही पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. लॉकडाऊन अंमलबजावणी, कंटेनमेंट झोन व्यवस्थापन, दैनंदिन आवश्यक वस्तुंची घरपोच सेवा या सर्वांमध्ये उत्कृष्ट काम केले आहे. जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प टेंभू, ताकारी व म्हैसाळ या उपसा सिंचन येाजनांमुळे 9 तालुक्यातील सुमारे 1 लाख 80 हजार हेक्टराहून अधिक क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार असून सद्यस्थितीत या सर्व क्षेत्रास सिंचनाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या लाभ दिला जातो. या उपसा सिंचन योजनांमधून सद्यस्थितीत वार्षिक 30 ते 35 टीएमसी पाणी अनेक टप्प्यांव्दारे उचलून आवर्षण भागातील शेतीसाठी सिंचन सुविधा पुरविण्यात येते. तसेच प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील लहान मोठे तलाव भरून दिले जात आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना व पशुधनास टंचाई कालावधीत टंचाई निवारणार्थ फार मोठी मदत झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कृषि विभागाच्या आत्मा अंतर्गत नाविण्यपूर्ण योजनेतून 200 शेत तलावामध्ये मत्स्यपालनाचा उपक्रम राबविण्यात आला. शेततळी अस्तरीकरणासाठी सुमारे 2 हजार शेतकऱ्यांना 12 कोटी अनुदान दिले. त्यामुळे शेततळ्यामध्ये 12 लाख 58 हजार 350 घनमीटर पाणीसाठ्यामध्ये वाढ होऊन त्याचा लाभ पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या क्षेत्रातील द्राक्ष पिकाला झाला असल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, 26 कोटी 25 लाख रूपये अनुदान वितरीत करून 13 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना 6784 हेक्टरवर ठिबक सिंचनाचा लाभ दिला. लॉकडाऊन काळात 3 हजार 906 क्विंटल बियाणे व 8 हजार 966 मेट्रिक टन रासायनिक खते 20 हजार 200 शेतकऱ्यांच्या बांधावर पुरवठा केली आहेत. प्रत्येक पातळीवर सर्वसामान्य माणसाचे जीवन सुरळीत चालावे यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगलीकरांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते कोरोना योध्दा पुरस्कार डॉ. प्रिया बिडवे, डॉ. अंजना पलकंडी, कक्षसेवक अनिल कांबळे, आशा वर्कर मनिषा कांबळे, साधना खाडे, अरूणा शिंदे, सहिदा जमादार व वर्षा ढोबळे, कोरोना विषयक विशेष कामगिरीबध्दल जमीर पाथरवट, अनिल मादरगे, कोरोना मुक्त झालेल्या हौसाबाई पाटील, ताराबाई खोत, बाबासाहेब खोत, प्रकाश पांढरे, कोरोना जनजागृतीसाठी पत्रकार दीपक चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2018-19 युवराज खटके, सुरेश चौधरी, सुरेश सावंत, प्रियंका कारंडे, गिरीष जकाते, विशाल पवार यांना देण्यात आला. सन 2016-17 चा जिल्हा युवा पुरस्कार प्रताप मेटकरी, योगीता मगदूम व एकलव्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सांगली यांना, 2017-18 चा जिल्हा युवा पुरस्कार चंद्रशेखर तांदळे, माया गडदे व इन्साफ नॅचरल सिक्युरिटी ऑफ ॲनिमल फाऊंडेशनचे अध्यक्ष मुस्ता मुजावर यांना व सन 2018-19 चा जिल्हा युवा पुरस्कार मयुर लोंढे, अनिता पाटील यांना पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते देण्यात आला. पूरस्कार वितरणानंतर पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्वातंत्र्य सैनिक, कोरोना योध्दे, नागरिक यांना भेटून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

आपत्ती काळासाठी पुढारीची महत्वाची मदत - पालकमंत्री जयंत पाटील

पुढारी रिलीफ फौंडेशनतर्फे महापालिकेस दोन यांत्रिक बोटी प्रदान सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : दैनिक पुढारी’ने पुढारी रिलीफ फौंडेशनच्यावतीने सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेला महापूर नियंत्रणासाठी देण्यात आलेल्या दोन यांत्रिक बोटी, लॉईफसेव्ह जॅकेटसह अत्यावश्यक साहत्य पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते महापौर गीता सुतार व आयुक्त नितीन कापडनीस यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, उपमहापौर आनंदा देवमने, दैनिक पुढारीचे आवृत्ती प्रमुख चिंतामणी सहस्त्रबुध्दे आदींसह पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. सामाजिक उत्तरदायित्व पार पाडण्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या पुढारी रिलीफ फौंडेशनने महापालिकेला दोन अत्याधुनिक यांत्रिक बोटी इंजिनसह, लॉफसेव्ह जॅकेट, बिओ रिंगसह दोर आदी सुमारे 10 लाखांचे साहित्य प्रदान करण्यात आले. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, नेहमीच विकासात्मक भूमिका घेणाऱ्या पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव व व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांनी ‘पुढारी रिलीफ फौंडेशनच्यावतीने अत्याधुनिक यांत्रिक बोटींसह बचावकार्यासाठी महापालिकेला दोन बोटींसह अत्याधुनिक साहित्य दिले आहे. आपत्ती काळात बचावासाठी बोटी व हे साहित्य महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ‘पुढारी’ने दिलेल्या यांत्रिक रबरी बोटी असून, त्याला असलेल्या मोटारीला 25 एचपी टू स्ट्रोक इंजिन आहे. यामुळे या बोटी अडचणीच्या व धोकादायक ठिकाणातही गतिमान पद्धतीने बचावासाठी फायदेशीर ठरणार आहेत. एका बोटीमध्ये दहाजणांची आसनक्षमता आहे. यासोबतच मोठ्यांसाठी लाईफसेफ्टी 20 जॅकेट, मुलांसाठी दहा लाईफसेफ्टी जॅकेट, 20 बीओ रिंग दोरसह आदी बचावात्मक साहित्याचा समावेश आहे. 00000

कोविड-19 महामारीला रोखण्यासाठी आवश्यक सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल - पालकमंत्री जयंत पाटील

मृत्यूदर कमी ठेवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी 11 कोटी 30 लाख रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यापुढेही या महामारीला रोखण्यासाठी आवश्यक सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती सभागृहात सांगली जिल्ह्यातील कोविड प्रादुर्भावाचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात सद्यस्थितीत 2 हजार 374 कोरोना बाधित रूग्ण उपचाराखाली आहेत. यातील 985 रूग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचाराखाली आहेत. त्यामुळे कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता खाजगी रूग्णालये अधिग्रहित करणे क्रमप्राप्त आहे. यासाठी खाजगी रूग्णालयांनी आवश्यक ते सर्व सहकार्य द्यावे. सर्वांनी मिळून कोरोना बाधितांवर उपचार करूया व मृत्यूदर कमीत कमी रहावा यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी खाजगी रूग्णांलयांना केले. यावेळी त्यांनी अनेक रूग्ण घाबरलेल्या स्थितीत असतात त्यामुळे ज्येष्ठ वैद्यकीय व्यवसायिकांनी त्यांच्यावर उपचार केल्यास, त्यांना धीर दिल्यास रूग्णांचे मनोधैर्य वाढेल व रूग्ण लवकरात लवकर बरा होण्यास त्याची मदत होईल. त्यामुळे संकटाच्या या वेळेत सर्वांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासन आणि खाजगी रूग्णालये यांच्यात सहजता यावी व सुसुत्रता यावी यासाठी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी खाजगी रूग्णालयांच्या समस्या जाणून घेतल्या. अनेक रूग्ण बेड्स च्या शोधात फिरतात त्यामुळे उपचारासाठी उशीर होतो हे टाळून खाजगी रूग्णालयांच्या कार्यपध्दतीमध्ये सुसुत्रता यावी यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या बेड मॅनेजमेंट सिस्टीमला प्रतिसाद देवून सर्वांनी ती वेळेत अद्ययावत ठेवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कोरोना बाधितांवर उपचार करण्यात येत असलेला मनुष्यबळाचा तुटवड्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मेडिकल कॉलेजच्या इंटर्नशिप करत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सेवा उपलब्ध करून घ्याव्यात, असेही त्यांनी यावेळी सूचित केले. या बैठकीत राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी अनेकदा खाजगी रूग्णालये आपली जबाबदारी झटकून रूग्णांना मोठ्या हॉस्पीटलच्या दिशेने पाठवितात. या ठिकाणी बेड्स उपलब्ध नसल्यास अडचणीचा प्रश्न येतो. हे टाळण्यासाठी आपल्याकडे येणाऱ्या रूग्णाला स्थितीचे गांभीर्य ओळखून प्राधान्याने उपचार सुरू करा, अशा सूचना खाजगी रूग्णालयांना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यात 80 टक्के आरोग्य सुविधा खाजगी क्षेत्रात आहेत. रूग्णांची वाढती संख्या पहाता खाजगी रूग्णालयांनी रूग्णसेवा देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. बेड्स उपलब्ध असतानाही रूग्णसेवा नाकारणे हे नैतिकता व कायदा या दोहोंना धरून नाही. गंभीर स्वरूपाच्या रूग्णांसाठी काही बेड्स राखीव ठेवावेत व रूग्णाला अन्यत्र न फिरवता तातडीने उपचार द्यावेत. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये सूचीबध्द होण्यासाठी खाजगी रूग्णालयांनी स्वत:हून क्षमतावृध्दी करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक असणारी मदत रूग्णालयांना प्रशासनामार्फत करण्यात येईल. याशिवाय अधिग्रहित खाजगी रूग्णालयांनी प्रशासनामार्फत वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे सांगितले. 00000

पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते पूरप्रवण गावांसाठी फायबर ग्लास यांत्रिक बोटींचे लोकार्पण

सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : गतवर्षी सांगली जिल्ह्याने भीषण महापुराचा सामना केला. त्यातुन जिल्ह्यात अद्ययावत अशा यांत्रिक बोटींची गरज अधोरेखित झाली. भविष्यात महापूराची स्थिती निर्माण झाल्यास जिल्ह्यात बोटींची सुसज्जता असावी यासाठी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नाविण्यपूर्ण योजनेतून फायबर ग्लास यांत्रिक बोटी खरेदी करण्यात आल्या. या बोटींचे लोकार्पण पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. यावेळी बोटींची पहाणी करताना अत्यंत सुंदर अशा बोटींची निर्मिती केल्याबद्दल त्यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुड्डेवार आणि पुरवठादार व्ही. डी. जामदार यांचे कौतुक केले. कृष्णा घाट सांगली येथे जिल्ह्यातील कृष्णा, वारणा नदी काठावरील पूर बाधित गावांना फायबर ग्लास यांत्रिक बोटींचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुड्डेवार, महानगरपालिकेचे पदाधिकारी आदि उपस्थित होते. जिल्हा परिषदेमार्फत पूर बाधित गावांना फायबर ग्लास यांत्रिक बोट पुरविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नाविण्यपूर्ण योजनेतून २ कोटी १० लाख रूपयांची तरतुद करून एकूण १५ बोटी खरेदी करण्यात आल्या. या फायबर ग्लास यांत्रिक बोटी शिराळा तालुक्यातील सागावं, कोकरूड व आरळा, वाळवा तालुक्यातील भरतवाडी, वाळवा, शिरगांव व गौंडवाडी, मिरज तालुक्यातील हरीपूर, अंकली, मौजे डिग्रज व माळवाडी तसेच पलूस तालुक्यातील भिलवडी, आमणापूर, ब्रम्हनाळ, घनगावं-तावदरवाड या प्रत्येक गावांना १ या प्रमाणे देण्यात येणार आहेत. या बोटीची प्रवासी क्षमता १६ प्रवासी अधिक २ चालक अशी १८ प्रवासी क्षमता असून आपत्ती अति तात्तडीच्यावेळी २० प्रवासी क्षमता आहे. बोटीची लांबी २४ फूट असून रूंदी ७ फुट, उंची २ फुट ६ इंच, फायबर जाडी तळाची ८ मि.मी., बाजूची जाडी 6 मि.मी., बोट शेप व्ही आकार असून फायबर मटेरियल रेनिज + फायबर मॅट (आयआरएस मान्यता प्राप्त) आहे. ३० एचपी इंजिन क्षमता असून २५ नग जीवन रक्षक कवच (लाईफ जॅकेट एमएमबी/आयआरएस मान्यता प्राप्त) प्रती बोट, ५ नग जीव रक्षक रिंग्ज, २५ किलो वजन नांगर, ४ नग ओर्स (वल्हे), १०० फुट लांबीचा २० मी.मी. जाडीचा नायनॉल दोर, बोटीच्या दोन्ही बाजूस रेलिंग, बोट वाहतुकीसाठी ट्रॉली अशी ॲसेसरी आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधून पूरबाधित गावांसाठी आणखी ७ फायबर ग्लास यांत्रिक बोटीसाठी ९८ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या बोटी दि. ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वितरणासाठी उपलब्ध होतील. या बोटी शिराळा तालुक्यातील मौजे चरण, वाळवा तालुक्यातील जुनेखेड, बिचुद व एैतवडे खुर्द, पलूस तालुक्यातील नागराळे व पुणदी (वा) तसेच मिरज तालुक्यतील पद्ममाळे या प्रत्येक गावासाठी एक या प्रमाणे देण्यात येणार आहेत. सदर बोटींची तपासणी मेरीटाईन बोर्डाकडून करून घेण्यात आली असून सुरक्षिततेबाबत कोणतीही त्रुटी नसल्याची खात्री करण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायतींना या बोटी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्यांनी बोटींची देखभाल ठेवणे आवश्यक असल्याचेही पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. याशिवाय आवश्यकतेनुसार आणखी बोटी उपलब्ध करून घेण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी जिल्ह्याला आवश्यक असणाऱ्या बोटींची बांधणी जिल्ह्यातील सुपुत्र श्री. जामदार यांनी अत्यंत अद्ययावत पध्दतीने केल्याबद्दल त्यांचे कौतुक करून पालकमंत्री जयंत पाटील यांनी संभाव्य महापूराला सक्षमपणे तोंड देता यावे यासाठी या बोटी तयार करून घेण्याचे निर्देशित केले होते, असे सांगून बोटी चालविण्याबाबत संबंधित गावातील नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 00000

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 32.2 मि. मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 6.61 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 32.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 7.1 (314.7), तासगाव 4.3 (294.3), कवठेमहांकाळ 3.9 (361.9), वाळवा-इस्लामपूर 5.6 (345.9), शिराळा 32.2 (798.6), कडेगाव 3.4 (298.2), पलूस 2.8 (248.2), खानापूर-विटा 3.4 (402.8), आटपाडी 0.0 (253.0), जत 0.3 (207.5). 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 29.44 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 08 , (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 29.44 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 71.56 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 8.49 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 6.98 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी., उरमोडी धरणात 8.03 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टी.एम.सी, तारळी धरणात 3.71 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 5.85 टी.एम.सी. आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 21.57 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.25 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 95.06 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे. सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 6500 क्युसेक्स, राधानगरी धरणातून 4256 क्युसेक्स, दुधगंगा धरणातून 4100 क्युसेक्स, कासारी धरणातून 1350 क्युसेक्स, कण्हेर धरणातून 24 क्युसेक्स व अलमट्टी धरणातून 1 लाख 80 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 10.4 (45), आयर्विन पूल सांगली 22.7 (40) व अंकली पूल हरिपूर 29.6 (45.11). 00000

जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 45.5 मि. मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 8.91 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 45.5 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 6.5 (307.6), तासगाव 3.4 (290), कवठेमहांकाळ 2.3 (358), वाळवा-इस्लामपूर 9.5 (340.3), शिराळा 45.5 (766.4), कडेगाव 7.6 (294.8), पलूस 1.0 (245.4), खानापूर-विटा 4.0 (399.4), आटपाडी 0.0 (253.0), जत 2.4 (207.2). 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 29.05 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 07 , (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 29.05 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 69.12 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 8.28 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 6.63 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी., उरमोडी धरणात 7.73 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टी.एम.सी, तारळी धरणात 3.53 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 5.85 टी.एम.सी. आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 21.05 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.36 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 97.28 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे. सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 4400 क्युसेक्स, राधानगरी धरणातून 7112 क्युसेक्स, दुधगंगा धरणातून 1000 क्युसेक्स, कासारी धरणातून 1350 क्युसेक्स व कण्हेर धरणातून 24 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 11.5 (45), आयर्विन पूल सांगली 23.9 (40) व अंकली पूल हरिपूर 29.6 (45.11). 00000

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

जिल्ह्यात 75 पूरप्रवण गावांना आपत्ती किटचे वाटप

सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात 104 पूरप्रवण गावे आहेत. या गावामध्ये आपत्कालीन साहित्य (आपत्ती किट) वाटप करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी घेतला होता. जिल्ह्यात मिरज तालुक्यात 20, पलूस 25, वाळवा 38 व शिराळा तालुक्यात 21 अशी एकूण 104 पूरप्रवण गावे आहेत. त्यानुसार प्राधान्याने एकूण 75 पूरप्रवण गावांना साहित्य खरेदी करण्यात आलेले असून त्याचे आज पूरप्रवण तालुक्यांना वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांनी दिली. प्रत्येक आपत्कालीन किटमध्ये मेगा फोन, रोप, बॅग, टॉर्च, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग असे साहित्य आहे. मिरज तालुका 17, वाळवा 31, पलूस 21 व शिराळा तालुक्यास 06 असे एकूण 75 आपत्कालीन साहित्याच्या किटचे आज वाटप करण्यात आले. यापूर्वी सर्व गावांचे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलेले आहे. तसेच सांगली जिल्ह्यामध्ये एन.डी.आर.एफ. ची दोन पथके (50 जवान) 15 जुलै पासून दाखल झालेली असून आष्टा व सांगली येथे ठेवण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे नवीन चार बोटी खरेदी करण्यात आलेल्या असून पलूस तालुक्यास 2 व वाळवा तालुक्यास 2 असे वाटप करण्यात आलेले आहे. 000000

जिल्ह्यातील वारणा धरणात 28.11 टी.एम.सी. पाणीसाठा