बुधवार, २० मार्च, २०२४

आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने 14,633 जाहिराती हटविल्या

सांगली दि. 20 (जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ जाहीर झाल्याने आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीला प्रारंभ झाला आहे. त्या अनुषंगाने निवडणूक जाहीर झाल्यापासून २४ तासाच्या आत शासकीय इमारती अथवा कार्यालयाच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर, पेपर, कटआउट, होर्डिंग्ज, जाहिरातींचे फलक, बॅनर्स प्रशासनाने हटवली असून याची संख्या सुमारे ५ हजार ५९ इतकी आहे. तसेच ४८ तासांमध्ये सार्वजनिक मालमत्ता व जागेच्या गैरवापर दूर करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाने ६ हजार ४०१ जाहिराती काढल्या. तर ७२ तासांमध्ये खाजगी मालमत्तेवरील सुमारे ३ हजार १७३ इतक्या जाहिराती आत्तापर्यंत काढून टाकण्यात आल्या. आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणाने अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने एकंदरीत सुमारे 14 हजार 633 इतक्या जाहिराती काढून टाकल्या आहेत. 000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा