गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२

हर घर तिरंगा महोत्सवांतर्गत आटपाडी तालुक्यात विविध कार्यक्रम - तहसिलदार बी. एस. माने

सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : हर घर तिरंगा महोत्सवांतर्गत आटपाडी तालुका प्रशासनामार्फत दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता भवानी हायस्कूल आटपाडी येथे भारताच्या नकाशामध्ये विद्यार्थी उभे करून राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी 4 हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तसेच शासकीय कार्यालयाचे 1 हजार अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती आटपाडी तहसिलदार बी. एस. माने यांनी दिली. तसेच दिनांक 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजता आटपाडी शहरातून स्वराज्य फेरी (रॅली) काढण्यात येणार आहे. स्वराज्य फेरीमध्ये 6 हजार 677 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. स्वराज्य फेरीची सुरूवात एसटी स्टँड आटपाडी येथून सुरू होवून तहसिल कार्यालय आटपाडी येथे या फेरीचा समारोप होणार असल्याचे तहसिलदार बी. एस. माने यांनी सांगितले. ०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा