बुधवार, ४ सप्टेंबर, २०१९

नदीकाठच्या नागरिकांना सतर्क रहाण्याचे आवाहन

सांगली, दि. 4 (जि. मा. का.) :  कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा नदीतील पाणीपातळी मध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठची गावे, वाड्या, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करु नये व सुरक्षेची काळजी घेवून सतर्क रहावे, असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नामदेव करे यांनी केले आहे.
धरणामध्ये पुढील प्रमाणे पाणीसाठा व विसर्ग चालू आहे. कोयना धरणात 104.72 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 99 टक्के भरले आहे. कोयना धरणातून 73 हजार 63 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धोम धरणात 12.82 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 95 टक्के भरले आहे. धोम धरणातून 460 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कन्हेर धरणात 9.89 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 98 टक्के भरले आहे. कन्हेर धरणातून 50 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे.  उरमोडी धरणात 9.90 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 99 टक्के भरले आहे. उरमोडी धरणातून 450 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तारळी धरणात 5.20 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 89 टक्के भरले आहे. वारणा धरणात 34.16 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 99 टक्के भरले आहे. वारणा धरणातून 3620 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
विविध ठिकाणी पडलेल्या पावसाची आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 71, नवजा 90, महाबळेश्वर 104, धोम 20, कन्हेर 12, उरमोडी 14, तारळी 2 व वारणा 36.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा