बुधवार, ४ सप्टेंबर, २०१९

नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 4, (जि.मा.का.) : कोयना धरणातून सद्या 73 हजार 63 क्युसेक्स विसर्ग सुरू असून चांदोली धरणातून 3400 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग असाच पुढील दोन दिवस सुरू राहिल्यास सांगली येथील आयर्विन पुलाजवळील सद्या 10 फूट 6 इंच असणारी पाणी पातळी 34 फूटावर जाण्याची शक्यता आहे. आयर्विन पुलाजवळ इशारा पातळी 40 फूट तर धोका पातळी 45 फूट आहे. पाणी नदी पात्रामध्ये रहाणार असले तरी नदीकाठच्या व सखल भागातील नागरिकांनी सावधानता बाळगून सतर्क रहावे व नदीपात्रामध्ये कोणीही जावू नये, धरणातून होणाऱ्या विसर्गावर प्रशासन नजर ठेवून आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये. घाबरून जावू नये पण सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नामदेव करे यांनी अलमट्टी धरणातून 1 लाख विसर्ग करण्याबाबत समन्वय ठेवण्यात आल्याचेही सांगितले.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा