बुधवार, ४ सप्टेंबर, २०१९

नदीकाठच्या लोकांना सावधानता बाळगण्याचे नदीपात्रात न जाण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : कोयना धरण पाणीसाठा 104.72 टी.एम.सी (99 टक्के) इतका झालेला आहे. कोयना धरण परिसरात अतिवृष्टी होत असून आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी 10.45 वाजता कोयना धरणाचे रेडियल गेट 8 फूटाने उघडण्यात येवून पाण्याचा विसर्ग 73 हजार 63 क्युसेक्स इतका करण्यात आला आहे. तसेच वारणा धरणातील विसर्ग  3 हजार 620 क्युसेक्स इतका आहे. यामुळे सांगली येथील सद्याच्या कृष्णा नदीच्या पात्रामधील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होवून सद्यस्थितीत 25 फूटापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या विशेषत: वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील तसेच महानगरपालिका क्षेत्रातील लोकांनी सावधानता बाळगावी व नदीपात्रामध्ये कोणीही जावू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा