सोमवार, ७ मार्च, २०२२

शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा जिल्ह्यात बुधवारपासून लोककलांव्दारे जागर

सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : ‍राज्याच्या महाविकास आघाडी शासनाला दोन वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा जिल्ह्यात लोककलांच्या माध्यमातून बुधवार, दि. 9 मार्च 2022 पासून जागर सुरु होत आहे. यामध्ये शाहीर बजरंग आंबी, शाहीर देवानंद माळी व शाहीर नायकू जाधव यांच्या पथकामार्फत विविध गावांमध्ये होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील तीन सर्वोकृष्ठ पथकांची निवड करुन राज्यात आपला महाराष्ट्र आपले सरकार, दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची या संकल्पनेअंतर्गत विविध योजना संकल्प उपक्रम मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यत पोहचविण्यात येत आहेत. यामध्ये कोरोना काळात शासनाने दिलेले आरोग्यासाठी प्राधान्य, पर्यटनाच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेले संकल्प, जलद वाहतूकीसाठी गती देण्यात येत असलेले, सागरी मार्ग, समृध्दी महामार्ग आणि मेट्रो प्रकल्प, शासनाचे पर्यावरण पूर्वक उपक्रम, महिला बालके यांच्यासाठीच्या विविध योजना आदींचा समावेश आहे.जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील एकूण 60 हून अधिक गावांमध्ये लोककलांच्या माध्यमातून जागर करण्यात येणार आहे. याचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा