सोमवार, १ जुलै, २०२४

कृषी दिनानिमित्त आयोजित प्रभात फेरीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

सांगली, दि. 1 (जि.मा.का.) :- माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात येते. या निमित्ताने कृषि विभाग व राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आज प्रभात फेरी काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते पालखीमध्ये गुलाबाचे रोपटे ठेवून प्रभात फेरीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, उप वनसंरक्षक निता कट्टे, सहायक उप वनसंरक्षक अजित साजने, विभागीय वन अधिकारी प्रशांत वरुडे यांच्यासह कृषी व वन विभागातील अधिकारी व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. 0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा