सांगली जिल्ह्यातील
4 उच्च शैक्षणिक
संस्थांची
उन्नत
भारत
अभियानासाठी
निवड
महात्मा
गांधी
यांचे
150
वे
जयंती
वर्ष
साजरे
करण्यात
सहभाग
सांगली,
दि. 4,
(जि. मा.
का.) : राष्ट्रपिता महात्मा
गांधी
यांची
150 वी जयंती साजरी
करण्यासाठी
केंद्रीय
मनुष्यबळ
विकास
मंत्रालयाच्या
वतीने
हाती
घेण्यात
आलेल्या
उन्नत भारत अभियानासाठी महाराष्ट्रातील एकूण
160 उच्च शैक्षणिक संस्थांची निवड
करण्यात
आली आहे. यामध्ये
सांगली जिल्ह्यातील
4 उच्च
शैक्षणिक संस्थांची
निवड करण्यात
आली आहे.
आदर्श
इन्स्टिट्युट ऑफ
टेक्नॉलॉजी अँड
रिसर्च सेंटर,
विटा, ता.
खानापूर, राजारामबापू
कॉलेज ऑफ
फार्मसी, कासेगाव,
ता. वाळवा,
श्रीमंत बाबासाहेब
देशमुख महाविद्यालय,
आटपाडी आणि
संजय भोकरे
ग्रुप ऑफ
इन्स्टिट्युटस्ची इंजिनिअरींग
शाखा अशी
या चार
महाविद्यालयांची नावे
आहेत. उन्नत भारत
कार्यक्रमांतर्गत
प्रत्येक महाविद्यालयाने
त्यांच्या तालुक्यातील
5 गावे,
खेड्यांमध्ये फील्ड व्हिजिट,
घरोघरी
जावून
सर्वेक्षण,
ग्रामीण
जनतेच्या
समस्या
व गरजांची माहिती घेणे
आणि त्यांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी विविध
तंत्र
व कार्यपद्धती विकसित करणे आदींचा
समावेश
आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने उन्नत भारत अभियानासाठी देशभरातील 840
उच्च
शैक्षणिक
संस्थांची
निवड
करण्यात
आली असून, त्यात
महाराष्ट्रातील
33 जिल्ह्यातील 75 तांत्रिक व
85 अतांत्रिक अशा एकूण 160
उच्च
शैक्षणिक
संस्थांचा
यात समावेश आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा