जिल्ह्यातील
90
हजार
107
शेतकऱ्यांच्या
याद्या
28
पर्यंत
उपलब्ध
-
जिल्हा
उपनिबंधक
निलकंठ
करे
-
म्हैसाळ
व
बनपुरी
येथे
आधार
प्रमाणिकरणाच्या
पथदर्शी
योजनेचा
शुभारंभ
सांगली,
दि.
24
(जिमाका) : महात्मा
जोतीराव
फुले
शेतकरी
कर्जमुक्ती
योजनेंतर्गत
जिल्ह्यातील
म्हैसाळ
येथील
थकबाकीदार
शेतकरी
सभासदांचे
आधार
प्रमाणिकरण
करून
या
योजनेचा
शुभारंभ
जिल्हा
उपनिबंधक
यांच्याहस्ते
करण्यात
आला.
जिल्ह्यातील
90
हजार
107
पात्र
शेतकऱ्यांच्या
याद्या
28
फेब्रुवारी
2020
पर्यंत
उपलब्ध
होतील,
असा
विश्वासही
त्यांनी
व्यक्त
केला.
महात्मा
जोतीराव
फुले
शेतकरी
कर्जमुक्ती
योजनेचा
जिल्ह्यातील
मिरज
तालुक्यातील
म्हैसाळ
आणि
आटपाडी
तालुक्यातील
बनपुरी
येथील
थकबाकीदार
शेतकऱ्यांचे
आधार
प्रमाणिकरण
करण्यात
आले.
म्हैसाळ
येथील
वसंत
विकास
सोसायटीमध्ये
आयोजित
केलेल्या
या
कार्यक्रमास
उपनिबंधक
मिरज
आदीनाथ
दगडे
तसेच
संस्थेचे
पदाधिकारी
यांच्यासह
अनेक
मान्यवर
उपस्थित
होते.
महात्मा
जोतीराव
फुले
शेतकरी
कर्जमुक्ती
योजनेंतर्गत
आज
जिल्ह्यात
म्हैसाळ
आणि
बनपुरी
येथील
आधार
प्रमाणिकरणाचे
कामाचा
पथदर्शी
योजना
हाती
घेतली
असून
या
दोन
गावातील
थकबाकीदार
शेतकऱ्यांच्या
याद्या
पूर्ण
झाल्या
असून
त्यांच्या
आधार
प्रमाणिकरणाच्या
कामाचा
शुभारंभ
आज
झाला.
म्हैसाळ
येथील
375
व
बनपुरी
येथील
221
पात्र
शेतकऱ्यांची
यादी
पोर्टलवर
असून
त्यांचे
आधार
प्रमाणिकरण
केले
जाणार
आहे.
या
याद्यामध्ये
काही
त्रुटी
आढळल्यास
त्यांची
त्या-त्या
स्तरावर
निर्गती
केली
जाईल,
असे
जिल्हा
उपनिबंधक
निलकंठ
करे
यांनी
स्पष्ट
केले.
यावेळी
जिल्हा
उपनिबंधक
यांनी
आधार
प्रमाणिकरणाच्या
कामाची
पाहणी
केली
तसेच
आधार
प्रमाणिकरण
केलेल्या
शेतकऱ्यांना
पोच
पावत्यांचे
वितरणही
त्यांच्या
हस्ते
करण्यात
आले.
महात्मा
जोतीराव
फुले
शेतकरी
कर्जमुक्ती
योजनेच्या
प्रभावी
अंमलबजावणीसाठी
जिल्हा
प्रशासन
सज्ज
असल्याचे
स्पष्ट
करून
जिल्हा
उपनिबंधक
निलकंठ
करे
म्हणाले,
या
योजनेच्या
अंमलबजावणीत
कोणत्याही
त्रुटी
राहु
नयेत,
यासाठी
प्रशासन
सतर्क
असून
जिल्ह्यातील
90
हजार
107
थकबाकीदार
शेतकरी
सभासदांची
जवळपास
528
कोटी
रूपयांची
कर्जमाफी
होवून
हे
शेतकरी
कर्जमुक्त
होतील.
या
सर्व
शेतकऱ्यांची
माहिती
पोर्टलवर
अपलोड
केली
असून
28
तारखेपर्यंत
याद्या
उपलब्ध
होतील.
या
याद्या
ग्रामपंचायत,
तलाठी
कार्यालय,
विकास
सोसायटी
तसेच
जिल्हा
मध्यवर्ती
बँकेच्या
संबंधित
शाखेत
लावल्या
जातील,
असेही
ते
म्हणाले.
नैसर्गिक
आपत्तीमुळे
अडचणीत
सापडलेल्या
शेतकऱ्यांना
शासनाच्या
महात्मा
जोतीराव
फुले
शेतकरी
कर्जमुक्ती
योजनेमुळे
दिलासा
मिळेल,
असा
विश्वास
त्यांनी
व्यक्त
केला.
कर्जमाफीमुळे
दिलासा -
संजय
बापू
पाटील
महात्मा
जोतीराव
फुले
शेतकरी
कर्जमुक्ती
योजनेमुळे
माझे
1
लाख
53
हजार
551
रूपयांचे
कर्ज
माफ
होवून
यामुळे
दिलासा
मिळाला
असल्याचे
समाधान
म्हैसाळ
येथील
शेतकरी
संजय
बापू
पाटील
यांनी
आधार
प्रमाणीकरणानंतर
व्यक्त
केले.
आजारपणामुळे
द्राक्ष
बागेकडे
लक्ष
देता
न
आल्याने
वसंत
विकास
सोसायटी
लि.
म्हैसाळ
कडील
1
लाख
53
हजार
551
रूपयांच्या
कर्जाची
परतफेड
करणे
अशक्य
झाले
असताना
शासनाच्या
या
कर्जमुक्तीमुळे
कुटुंबाला
दिलासा
मिळाला
असून
हा
माझ्यासाठी
आणि
माझ्या
कुटुंबासाठी
सर्वात
आनंदाचा
क्षण
असल्याचेही
त्यांनी
स्पष्ट
केले.
समारंभास
उपनिबंधक
मिरज
आदिनाथ
दगडे,
वसंत
विकास
सोसायटीचे
चेअरमन
धनराज
शिंदे,
सचिव
भरत
माळी,
ग्रामपंचायत
सदस्य
दौलत
शिंदे
यांच्यासह
मान्यवर,
पदाधिकारी,
अधिकारी,
शेतकरी
आणि
ग्रामस्थ
उपस्थित
होते.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा