गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३

'आयुष्मान भव' मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 21 (जि.मा.का.) :- 'आयुष्मान भव' मोहिमेची व्यापक जनजागृती करून ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. 'आयुष्मान भव' मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, नेत्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. शरद शेगावकर, जिल्हा समन्वयक अविनाश शिंदे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, आयुष्मान कार्ड काढण्याचे काम प्राधान्याने पूर्ण करावे. हे कार्ड काढण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी वरिष्ठ स्तरावर कळवून त्याचे निराकरण करून घ्यावे. यासाठी एक संनियंत्रण समिती गठीत करावी. 'आयुष्मान भव' या मोहिमेंतर्गत घेण्यात येणाऱ्या आरोग्य मेळाव्यात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. यामध्ये आवश्यक मनुष्यबळ, औषध पुरवठा, तज्ज्ञ डॉक्टर याचा समावेश असावा. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा