शुक्रवार, २ डिसेंबर, २०२२

शेतकऱ्यांनी माती परिक्षण करून घ्यावे - वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी

अटल भूजल योजनेंतर्गत झुरेवाडी येथे माती परिक्षण सांगली, दि. 2, (जि. मा. का.) : जल सुरक्षा आराखड्यामध्ये सूचविल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सुक्ष्म सिंचनाचा वापर करावा तसेच जमिनीतील घटकांची कमतरता भरुन काढण्याकरीता सुक्ष्म सिंचनाव्दारे खतांची मात्रा देता येते. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी माती परिक्षण करुन घ्यावे. सूक्ष्म सिंचनासाठी अटल भूजल योजनेमधून 25 व 30 टक्के वाढीव अनुदान देण्यात येते. अशी माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी यांनी दिली. वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी यांच्या मार्गदर्शनानुसार कवठेमहांकाळ तालुक्यातील मौजे झुरेवाडी येथे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभाग व कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माती परिक्षण करण्याकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले. परिक्षणाकरीता माती नमुने गोळा करण्याचे प्रात्यक्षिक व उपाययोजना याबाबत कृषि विभागाचे श्री. मुळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच सुमन साठे, कृषि सहाय्यक धीरज गिरी, ज्येष्ठ नागरीक सर्जेराव देशमुख, पोलीस पाटील अनुराधा जाधव, ग्रामपंचायत सदस्य शोभा माळी, कृषि मित्र गणेश झुरे, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षातील माहिती शिक्षण संवाद तज्ञ कुणाल शितोळे, कृषि तज्ञ नागनाथ पाटील, जिल्हा अंमलबजावणी भागीदारी संस्थेच्या अंजली वाघे, कु. देवकुळे, पियुष कुंभार, ज्ञानेश्वर सरडे, कु. तनुजा मोरे, अभिषेक पाटील व गावातील शेतकरी उपस्थित होते. जागतिक बँक व केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल योजना सांगली जिल्ह्यातील 95 गावांमध्ये राबविण्यात येत असून भूजल पातळीची घसरण थांबविणे व पाणी बचतीच्या उपाययोजना अवलंब करुन पाण्याचा कार्यक्षम वापर करणे हा योजनेचा प्रमुख उद्देश आहे. शेतकऱ्यांनी मातीतील घटक तपासून मातीची गुणवत्ता चांगली राखण्याकरीता मातीतील नत्र, स्फुरद, पालाश, सेंद्रिय, पदार्थ, मातीचा सामू इत्यादी बाबी तपासून घेवून त्यानुसार उपाय योजना करता याव्यात हा उद्देश माती परिक्षणाचा आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा