मंगळवार, २१ मार्च, २०२३

कृषी महोत्सवामध्ये ऊस पिकावर परिसंवाद

सांगली दि.19 (जिमाका) : सांगली जिल्हा कृषी महोत्सव 2023 मध्ये दिनांक 19 मार्च 2023 रोजी परिसंवाद व चर्चासत्र या कार्यक्रमात कृषिरत्न डॉ. संजीव माने यांनी उपस्थिताना एकरी दीडशे टन ऊस उत्पादन या विषयी सविस्तर सखोल मार्गदर्शन केले. डॉ. संजीव माने म्हणाले, ऊस शेती करत असताना जमिनी कसदार असणे आवश्यक आहे. ऊसामध्ये एकरी चाळीस हजार उसाची संख्या आवश्यक आहे. त्याच्यासाठी फुटव्यांची संख्या निर्धारित करणे फार गरजेचा आहे. सेंद्रिय खताबरोबर रासायनिक खताचा संतुलित वापर होणे आवश्यक आहे. पाणी व्यवस्थापन करत असताना जमिनीमध्ये वापसा टिकवने अत्यंत महत्त्वाचा असते त्यामुळे पिकांना आवश्यक असणारे सर्व घटक जमिनी मध्ये मुळांना उपलब्ध होतात. पिकाच्या वाढीसाठी त्याचा वापर होतो. भरपूर पाणी न देता थोडं -थोडं पाणी, सारखं देणे आवश्यक आहे .त्यासाठी ऊस शेतामध्ये ठिबक सिंचन आवश्यक आहे.याप्रमाणे ऊस शेतीचे नियोजन केल्यास हेक्टरी दीडशे टन ऊस उत्पादन शक्य होऊ शकते असे ते म्हणाले . यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी व शेतकरी उपस्थित होते . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कुमार खारगे यांनी केले तर आभार कडेगाव तालुका कृषी अधिकारी बाळकृष्ण कदम यांनी मानले. 000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा