सांगली, दि. 17 (जिमाका) : लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या 36 व्या पुण्यतिथीनिमित्त
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर येथे राजाराम बापुंच्या पुतळ्यास
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
यावेळी जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री
जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्य
मंत्री (शहर) सतेज पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराजे देसाई, कृषी राज्यमंत्री
डॉ. विश्वजित कदम, कारखान्याचे अध्यक्ष पी.आर. पाटील, उपाध्यक्ष विजयबापू पाटील, जिल्हाधिकारी
डॉ. अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा
डुबुले यांच्यासह कारखान्याचे संचालक तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी आणि नागरीक
उपस्थित होते.
0 00 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा