शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०२३

िल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या उपस्थितीत सद्भावना दिनानिमित्त प्रतिज्ञा

ज सांगली दि. 18 (जि.मा.का.) : माजी प्रधानमंत्री भारतरत्न दिवंगत राजीव गांधी यांचा 20 ऑगस्ट हा जन्म दिवस सद्भावना दिन म्हणून पाळला जातो. या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी माजी प्रधानमंत्री भारतरत्न दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तद्नंतर सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेण्यात आली. सद्भावना दिवस प्रतिज्ञा कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्यासह अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खरात, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, तहसीलदार अनंत गुरव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मी अशी प्रतिज्ञा करतो की, मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता, सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो की, आमच्यामधील सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करून व संविधानिक मार्गाने सोडवीन... अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. ०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा