बुधवार, १३ जुलै, २०२२

कोविड-१९ आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्यसाठी विहीत मुदतीत अर्ज करणे आवश्यक - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : कोविड-१९ या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास 50 हजार रूपये इतके सानुग्रह सहाय्य देण्याची योजना दिनांक 1 डिसेंबर 2019 पासून ऑनलाईन कार्यान्वित करण्यात आलेली आहे. शासनाच्या दि. 11 एप्रिल 2022 रोजीच्या परिपत्रकानुसार कोविड-19 आजारामुळे दिनांक 20 मार्च 2022 पूर्वी मृत्यू झालेला असल्यास दिनांक 24 मार्च 2022 पासून 60 दिवसाच्या आत म्हणजेच दिनांक 24 मे 2022 पर्यंत व दि. 20 मार्च 2022 पासून पुढे मृत्यू झाल्यास मृत्यूच्या दिनांकापासून 90 दिवसाच्या आत सानुग्रह सहाय्य योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. मुदतीच्या नंतरचे अर्ज केवळ गाऱ्हणे निवारण समिती (GRC) मार्फत करता येतील. या योजनेकरीता ज्या अर्जदारांनी सानुग्रह सहाय्यसाठी चुकीचा दावा दाखल केलेला आहे त्यांच्याविरुध्द जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 52 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा