गुरुवार, २२ जून, २०२३

महाराष्ट्र प्राणी रक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : बकरी ईद सण 2023 च्या अनुषंगाने संबंधित सर्व विभागांनी महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा 1976, महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995, प्राणी छळ प्रतिबंधक कायदा 1960 अंतर्गत कत्तलखाना अधिनियम व ट्रान्सपोर्ट ऑफ ॲनिमल्स रुल्स, 1978 तसेच ट्रान्सपोर्ट ऑफ ॲनिमल्स (अमेंडमेंट) नियम 2009 च्या तरतुदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. विनाकारण कोणत्याही वाहन चालकाला त्रास देऊ नये. तसेच महानगरपालिका, पोलीस प्रशासन, पशुसंवर्धन विभाग यांनी संबंधित नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 कायदा 4 मार्च 2015 पासून महाराष्ट्रात लागू करण्यात आला आहे. या सुधारीत कायद्यातील कलम 5 अन्वये कोणतीही व्यक्ती राज्यातील कोणत्याही ठिकाणी गायींची, वळूंची किंवा बैलांची कत्तल करणार नाही. कलम 5 अ (1) अन्वये कत्तल करण्यासाठी गाय, वळू किंवा बैल यांची वाहतूक करण्यास प्रतिबंध तसेच कलम 5 अ (2) कत्तल करण्यासाठी गाय, वळू किंवा बैल यांची निर्यात करण्यास प्रतिबंध. कलम 5 ब गाय, वळू किंवा बैल यांची अन्य कोणत्याही पध्दतीने विक्री, खरेदी करण्यास, विल्हेवाट लावण्यास प्रतिबंध. कलम 5 क गाय, वळू किंवा बैल यांचे मांस ताब्यात ठेवण्यास मनाई. कलम 5 ड महाराष्ट्र राज्याबाहेर कत्तल केलेले गाय,वळू किंवा बैल त्यांचे मांस ताब्यात ठेवण्यास मनाई असून या कायद्याचे उल्लंघन केल्यास कडक शिक्षेची तरतूद असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. 0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा