मंगळवार, ३१ जुलै, २०१८

जिल्ह्यात दिलेल्या उद्दिष्टाच्या 100 टक्केपेक्षा जास्त वृक्षलागवड - उप वनसंरक्षक (प्रा.) डॉ. भारत सिंह हाडा

सांगली, दि. 31, (जि. मा. का.) : राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत सांगली जिल्ह्यात 1 ते 31 जुलै या कालावधीत जिल्ह्यातील सर्व यंत्रणा, लोकप्रतिनिधी, निसर्गप्रेमी, वनप्रेमी ग्रामस्थ यांच्या उत्स्फूर्त सहभागाने वृक्षलागवडीचे 113.20 टक्के वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे, अशी माहिती उप वनसंरक्षक (प्रा.) डॉ. भारत सिंह हाडा यांनी दिली.
    डॉ. भारत सिंह हाडा म्हणाले, 13 कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत सांगली जिल्ह्यात वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग , ग्रामपंचायत इतर यंत्रणा यांना 29 लक्ष 17 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले होते. मोहीम कालावधीत जिल्ह्यात ऑनलाईन नोंद झालेली वृक्षलागवड 29 लाख 24 हजार 149 ऑफलाईन पध्दतीने नोंद झालेली वृक्षलागवड 4 लाख 11 हजार 143 अशी एकूण 33 लाख 35 हजार 292 वृक्ष लागवड झाली आहे. यामध्ये तालुकानिहाय ऑनलाईन ऑफलाईन पध्दतीने झालेली एकत्रित वृक्षलागवड पुढीलप्रमाणे आहे. आटपाडी - 3 लाख 14 हजार 168, जत - 5 लाख 76 हजार 852, कडेगाव - 2 लाख 13 हजार 506, कवठेमहांकाळ - 3 लाख 8 हजार 525, खानापूर - 4 लाख 60 हजार 773, मिरज - 3 लाख 12 हजार 594, पलूस - 1 लाख 44 हजार 7, शिराळा - 3 लाख 59 हजार 260, तासगाव -      2 लाख 32 हजार 704, वाळवा - 4 लाख 12 हजार 903.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा