सांगली,
दि.
14,
(जि.
मा.
का.)
:
कोरोनो
विषाणूचा
संसर्ग
वाढू
नये
यासाठी
जिल्हादंडाधिकारी
डॉ.
अभिजीत
चौधरी
यांनी
सांगली
जिल्हा
स्थलसीमा
हद्दीत दिनांक 15 एप्रिल
2020
रोजीचे
00.01
वाजल्यापासून
ते
दिनांक
30
एप्रिल
2020
रोजीचे
रात्री
24.00
वाजेपर्यंत
फौजदारी
प्रक्रिया
संहिता
1973
चे
कलम
144
लागू
केले
आहे.
सदर
कालावधीत
5
किंवा
त्यापेक्षा
अधिक
लोकांनी
एकत्रित
येणे,
गटागटाने
फिरणे
व
उभा
राहण्यास
मनाई
करण्यात
आली
आहे.
मात्र अंत्यविधी/ अंत्यविधी
यात्रा
याकरिता
20
व्यक्ती
मर्यादेपर्यंत
सूट
देण्यात
आली
आहे.
हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असणाऱ्या व अन्य अत्यावश्यक सेवा सुविधा व वस्तू यांच्या पुरवठ्याशी संबंधित व्यक्ती व वाहने आणि कोणत्याही स्वरूपाच्या निकडीच्या प्रसंगास व शासकीय कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा