सांगली,
दि.
14,
(जि.
मा.
का.)
:
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात सेतू, ई-सेतू व महा ई केंद्रावर विविध दाखले व इतर कामकाजासाठी मोठ्याप्रमाणावर लोकांची गर्दी होते. कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना या विषाणूचे संसर्ग रोखण्यासाठी तसेच कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता, सदर विषाणूची लागण एका संक्रमीत रुग्णाकडून अन्य व्यक्तीस त्यांच्या संपर्कात आल्याने होते. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सेतू, ई-सेतू व महा ई केंद्रे दिनांक 15 एप्रिल 2020
रोजीचे
00.01
वाजल्यापासून
ते
पुढील
आदेश
होई पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा