सांगली, दि. 22 (जि.मा.का) : महापुरामुळे जिल्ह्यातील 3 हजार
877 घरे पूर्णत: तर 7 हजार 932 घरे अंशत: पडली आहेत. पडझड व नष्ट झालेल्या 146
झोपड्या असून 101 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. घरांचे
पंचनामे गतीने सुरू असून 21 ऑगस्ट अखेर पूर्णत: पडझड झालेल्या पक्क्या व कच्च्या
घरांची संख्या 3 हजार 877 इतकी आहे. अंशत: पडझड झालेली घरे 7 हजार 932 आहेत. तर
146 झोपड्या पडझड व नष्ट झाल्या आहेत. बाधित गोठे 101 आहेत. अशी माहिती
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
यामध्ये मिरज तालुक्यात पूर्णत: पडझड झालेल्या पक्क्या व
कच्च्या घरांची संख्या 622 असून अंशत: पडझड झालेल्या घरांची संख्या 916 आहे. बाधित
गोठ्यांची संख्या 90 आहे. महानगरपालिका क्षेत्रात पूर्णत: पडझड झालेल्या पक्क्या व
कच्च्या घरांची संख्या 121 असून अंशत: पडझड झालेल्या घरांची संख्या 400 आहे. वाळवा
तालुक्यात पूर्णत: पडझड झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांची संख्या 1187 असून अंशत:
पडझड झालेल्या घरांची संख्या 2560 आहे. शिराळा तालुक्यात पूर्णत: पडझड झालेल्या
पक्क्या व कच्च्या घरांची संख्या 27 असून अंशत: पडझड झालेल्या घरांची संख्या 1
हजार आहे. बाधित गोठ्यांची संख्या 7 आहे. पलूस तालुक्यात पूर्णत: पडझड झालेल्या
पक्क्या व कच्च्या घरांची संख्या 1920 असून अंशत: पडझड झालेल्या घरांची संख्या 2080
आहे तर पडझड व नष्ट झालेल्या झोपड्यांची संख्या 146 आहे. खानापूर-विटा तालुक्यात
अंशत: पडझड झालेल्या घरांची संख्या 131 आहे तर बाधित गोठ्यांची संख्या 2 आहे.
तासगाव तालुक्यात अंशत: पडझड झालेल्या घरांची संख्या 294 आहे तर बाधित गोठ्यांची
संख्या 2 आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा