गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

जिल्ह्यातील वारणा धरणात 32.46 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात दिनांक 22 ऑगस्ट रोजी सकाळी 8 पर्यंत 32.46 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
          दिनांक 22 ऑगस्ट रोजीच्या सकाळी 8 वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 100.50 टी.एम.सी. इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 12.81 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 9.74 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 24.44 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी  धरणात 7.90  टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 119.57 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
  तसेच कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 716 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणातून 5 हजार 991 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. आयर्विन पुल सांगली येथे 9 फूट इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी 45 फूट) तर अंकली पुल हरिपूर येथे 6 फूट 11 इंच इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी 50 फूट 3 इंच).
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा