सांगली,
दि. 23, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुराने
बाजारपेठा, घरे, संसार या सर्वच घटकांना मोठ्याप्रमाणावर फटका बसला आहे. या
पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुभाष देशमुख व जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्तांना
मदतीसाठी केलेल्या आवाहनाला राज्यभरातून अनेक संस्था, संघटना, दानशूर व्यक्ती
यांनी खूप मोठा प्रतिसाद दिला. आयसीआयसीआय बँकेने आज पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 25
लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे दिला. यावेळी झोनल
हेड अशिष रंजन, रिजनल हेड संबित मल्लिक, विकास देशमुख, शाखाधिकारी नितिन जेधे
यांनी हा धनादेश सुपूर्द केला.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा