सांगली, दि. 22
(जि.मा.का) :
सांगली जिल्ह्यात महापूराने 104 गावे
बाधित झाली आहेत. बाधित पूरग्रस्त कुटुंबांना ग्रामीण भागात 10 हजार आणि शहरी
भागात 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. त्यापैकी 5 हजार
रुपयांचे रोख वाटप करण्यात येत आहे. दिनांक 21 ऑगस्ट अखेर 55 हजार 459 कुटुंबाना
यामध्ये ग्रामीण भागातील 38 हजार 137 आणि शहरी भागातील 17 हजार 322 कुटुंबाना
रोखीने एकूण 27 कोटी 72 लाख 95 हजाराचे सानुग्रह अनुदान पूरग्रस्त कुटुंबाना
वितरीत करण्यात आले आहे. उर्वरित कुटुंबांनाही अनुदान वाटप सुरु आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी
डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
सांगली
जिल्ह्यात 104 गावे पूरबाधित असून यामध्ये अंदाजे ग्रामीण भागातील 45 हजार 293 तर
शहरी भागातील 42 हजार 646 कुटूंबे बाधित आहेत. यापैकी मिरज तालुक्यातील 20 गावे
बाधित असून यातील ग्रामीण भागातील 12 हजार 176 तर शहरी भागातील 17 हजार 307
कुटुंबाना 14 कोटी 74 लाख 15 हजार रूपये, वाळवा-इस्लामपूर तालुक्यातील 38 गावे
बाधित असून यातील 12 हजार 113 कुटुंबाना 6 कोटी 5 लाख 65 हजार रूपये, शिराळा
तालुक्यातील 21 गावे बाधित असून यातील 590 कुटुंबाना 29 लाख 50 हजार रूपये आणि
पलूस तालुक्यातील 25 गावे बाधित असून यातील 13 हजार 258 ग्रामीण तर 15 शहरी
कुटुंबाना 6 कोटी 63 लाख 65 हजार रूपयाचे सानुग्रह अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
.
वाळवा-इस्लामपूर
तालुक्यातील 1 हजार 433 कुटुंबाना 5 हजार रूपयांची रक्कम वजा जाता उर्वरित 71 लाख
65 हजाराची रक्कम धनादेशाव्दारे बँकेत जमा करण्यात आली आहे. तर शिराळा तालुक्यातील
570 कुटुंबाना 28 लाख 50 लाख रूपये रक्कम बँकेत धनादेशाव्दारे जमा करण्यात आली
आहे. अशी एकूण 2 हजार 3 कुटुंबांना 1 कोटी 15 हजार रूपयांची रक्कम बँकेत
धनादेशाव्दारे जमा करण्यात आली आहे. उर्वरित कुटुंबांनाही सानुग्रह अनुदान वितरण व
बँकेत जमा करण्याचे काम सुरू आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा