रविवार, २२ मार्च, २०२०

सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत २३ ते ३१ मार्च पर्यंत कलम 144 लागू



सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : देशातील व राज्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता सांगली जिल्ह्यात लोकांनी एकत्र येवून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये या पार्श्वभूमीर जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत दिनांक 23 मार्च 2020 रोजीचे 05.00 वाजल्यापासून ते दिनांक 31 मार्च 2020 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले आहे. सदर कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्रित येणे, गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे.
हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असणाऱ्या व अन्य अत्यावश्यक सेवा सुविधा व वस्तू यांच्या पुरवठ्याशी संबंधित व्यक्ती व वाहने आणि कोणत्याही स्वरूपाच्या निकडीच्या प्रसंगास (emergency) व शासकीय कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा