सांगली,
दि. 23, (जि. मा. का.) : कोरोना
विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याच्या
अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. २३ मार्च २०२० पासून ते
दि. ३१ मार्च २०२० रोजीचे रात्री १२ वाजेपर्यंत सांगली जिल्ह्यात पुढीलप्रमाणे
बंदी लागू केली आहे. या आदेशानुसार सर्व प्रकारच्या खाजगी व सार्वजनिक, प्रवासी व
माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना सदरचे बंदी आदेश लागू राहतील. मात्र अत्यावश्यक
वस्तू उदा. अन्न धान्य, फळे, किराणा, दुध, मांस, औषधे, कीड नियंत्रण विषयक व
प्रशासकीय, वैद्यकीय सेवा तसेच इतर अत्यावश्यक सेवेच्या वाहतुकीसाठी व निकडीच्या
प्रसंगासाठीच्या (emergency) वापरण्यात येणाऱ्या खाजगी व सार्वजनिक वाहनांना सदरचा
बंदी आदेश लागू राहणार नाही.
सदरचा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी
भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 43,
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, कलम 34 मधील पोटकलम (c) व (m), महाराष्ट्र शासन
क्र. करोना 2020.प्र.क्र.58/आरोग्य6 दि. 14 मार्च 2020 नुसार प्रदान केलेल्या
अधिकाराचा वापर करून जारी केला आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरूध्द आपत्ती
व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188
नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईन व पुढील कारवाई करण्यात
येईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा