शुक्रवार, २० मार्च, २०२०

बँकामधील गर्दी टाळून एटीएम व इंटरनेट बँकिंगचा वापर करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : बँका या अत्यावश्यक सेवा प्रकारात येत असल्याने बँकांची शाखा कार्यालये ग्राहकांसाठी खुली राहणार आहेत. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील बँकात होणारी अनावश्यक गर्दी टाळावी. ग्राहकांनी बँकेत येण्यापेक्षा इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, पैसे भरण्याचे मशीन तसेच एटीएमचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
बँक शाखा कार्यालयांमधील गर्दी रोखणे हे बँक कर्मचारी तथा ग्राहकांसाठी एक आवाहन आहे. ज्या व्यक्तीचे काम आहे, त्याच व्यक्तीने केवळ बँकेमध्ये यावे. अन्य कर्मचारी, तसेच इतर ग्राहक यांच्यामध्ये 3 ते 5  फुटांचे सुरक्षित अंतर ठेवावे. जिल्ह्यात एकूण 30 बँका कार्यरत असून 483 शाखा आहेत. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणि बँकाकडे असलेल्या डिजिटल बँकिंग सुविधांमुळे ग्राहक बहुतांश व्यवहार बँकामध्ये येताही करू शकतात. रिजर्व बँकेच्या धोरणानुसार रोखीचे व्यवहार टाळा आणि डिजिटल बँकिंगचा जास्तीत जास्त उपयोग करा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा